अकोला – शिवानी परिसरात मास विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने अकोला जिल्हाधिकारी यांनी तक्रार प्राप्त होताच तात्काळ निर्णय घेऊन एम आय डी सी पोलीस स्टेशन ला या मास विक्रेत्यांवर गुन्हा नोंदविण्यास सांगितले, मात्र अकोला शहरात गेल्या कित्येक दिवसापासून विविध प्रकारचे अतिक्रमण आहे मात्र कोणीच कशी तक्रार केली नाही हा आश्चर्याचा विषय ठरतो आहे.
अकोला शहारत अतिक्रमणामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते हजारो तक्रारी करून देखील या ठिकाणी का होत नाही कारवाही या गहन प्रश्नाचे उत्तर अकोलेकरांना केव्हा मिळेल
प्रशासन आणि शासन या मध्ये जेव्हा विचार, उद्देश आणि मत भिन्नता असते तेव्हा त्या शहरात अतिक्रमण झाल्या शिवाय राहणार नाही. हि बाब तेवढीच खरी आहे.