
पश्चिम विदर्भामधील पाच जिल्ह्यांतील धक्कादायक प्रकार आला समोर….
पश्चिम विदर्भात तीन महिन्याची धक्कादायक माहिती
पोलिस तपासात नेमके काय तथ्य येते बाहेर
काही मुली व महिला परत आणल्याचा दावा
पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये मुली आणि महिला बेपत्ता होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. असून गेल्या तीन महिन्यांत तब्बल ८१२ मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यात १६ ते २५ वर्षे वयोगटातील महिलांची संख्या सर्वाधिक आहे.गेल्या तीन महिन्यांत अमरावती शहरातून ९७, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून १७५ मुली आणि महिला हरवल्याची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातून १९४, बुलढाणा जिल्ह्यातून १७०, अकोला जिल्ह्यातून १०३, तर वाशीम जिल्ह्यातून ७६ मुली, महिला बेपत्ता झाल्या आहेत. विशेषत: अठरा वर्षांखालील हरवलेल्या मुलामुलींची संख्या वाढत आहे. अनेक घटनांमध्ये मुलींच्या बाबतीत पळून जाऊन लग्न करणे, हे कारण प्रामुख्याने समोर येत असले, तरी त्याबाबत नंतर माहिती घेतली जात नाही, अनेक घटनांमध्ये बदनामीच्या भीतीने तक्रारही दिली जात नाही. अकोला पोलिसांनी आज दिलेल्या माहितीनुसार अनैतिक मानवी वाहतुक कक्षाने मागिल महिन्यापासून आज पर्यंत महिलांसंदर्भातील ३४ गुन्हे व २२ मिसिंग प्रकरणात ५६ गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती दिली आहे. महिलांच्या मिसिंगचे वाढते प्रमाण हे समाजासाठी चितेंची बाब झाली आहे.