वडद येथील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची आली वेळ !

अकोला


आत्महत्या करण्यापासून थांबवण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
का आली या शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ?

अकोला तालुक्यातील मौजे वडद येथील इ क्‍लास जमिनीवर पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून जिल्हा प्रशासनाने आम्हाला आत्महत्या करण्यापासून थांबवावे व आम्हाला न्याय द्यावा अशा प्रकारचे निवेदन त्यांनी आज जिल्हाधिकारी याना दिले.

अकोला तालुका अंतर्गत येत असलेल्या मौजे वडद येथील शेतकरी गेल्या 80 वर्षांपासून इ क्लास जमिनीवर दर वर्षी पेरणी करून आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह करीत आहे, परंतु या वर्षी जिल्हा प्रशासनाने काढलेल्या नवीन फर्मान मुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे, काही दिवस पूर्वी जिल्हा प्रशासनाने मौजे वडद येथील इ क्लास जमीनीवर वनीकरण योजना राबविण्यात येणार असे सांगत मौजे वडद येथील शेतकऱ्यांवर अन्याय केला असल्याचा आरोप शेतकऱ्यांन कडून करण्यात येत आहे, सदर मौजे वडद येथील जमिहीन शेतकऱ्यांनी दर वर्षी सारखे या वर्षी सुद्धा पेरणी करण्या करता बियाणे, खत तसेच कीटकनाशक व्याजाने पैसे काढून विकत घेतले परंतु या वर्षी त्यांनी सदर जमिनीवर पेरणी करू नये तसेच वडद गावातील कोणत्याही व्यक्तींनी त्यांना पेरणी करीत बैलजोडी, नांगर तसेच इतर साहित्य देऊ नये असे फलक त्यांच्या जमिनीवर लावल्याने त्यांच्यावर या वर्षी उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे, आम्हाला या वर्षी जर जमीन शेती साठी नाही मिळाली तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही व आमच्या आत्महत्या चे मुख्य कारण प्रशासन राहणार असल्याचा आरोप मौजे वडद येथील शेतकऱ्यांनी आर.आर.सि. न्युज शी बोलतांना व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *