वाण धरणाचे 6 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू

अकोला ब्रेकिंग

तेल्हारा तालुक्यातील हनुमान सागर म्हणजेच वाण धरणाचे 6 दरवाजे उघडून आज पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून या भागातील नदी काठच्या 18 गावाना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे..

तेल्हारा तालुका अंतर्गत येत आठवल्या वारी हनुमान येथील वाण धरणाचे 5 दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले असून या मधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनान तर्फे देण्यात आली असून वाण नदी काठच्या सर्व गावाला सर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, गेल्या 24 तासान पासून वाण प्रकल्पाच्या क्याचमेन्ट भागात सर्वाधिक पाऊस पढल्याने सदर प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, वान प्रकल्पाचे एकूण 6 दरवाजे उघडण्यात आले असून त्या मध्ये 4 गेट हे प्रत्येकी ५० सेंटी मीटर उंचीने तर उर्वरित 2 दरवाजे हे 30 सेंटी मीटर नि उघडण्यात आले असून तेल्हारा तसेच जळगाव जामोद भागातील 18 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी RRC न्युज शी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *