
आझादी का अमृत महोत्सवाची तयारी
देशभक्तीपर घोषणेने शहर दुमदुमले
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ कार्यक्रमाअंतर्गत केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेचे आयोजन केले आहे. या अनुषंगाने आज जिल्हा प्रशासना तर्फे सर्व महसूल विभागाचे निवासी उपजिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी यांनी घोड्यावर बसून तिरंगा रॅली काढत आझादी का अमृत महोत्सवाची जनजागृती केली.
‘हर घर तिरंगा’ अर्थात घरोघरी तिरंगा हा उपक्रम केवळ देशभक्ती पुरता मर्यादित नाही. तर आपल्या कर्तव्यालाही अधोरेखित करणारा उपक्रम आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान जिल्हाभरात हा तिरंगा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याच्या अनुषंगाने आरोग्यविभागाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली ची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय येथून करण्यात आली, या वेळी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांच्या सह निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, उओ विभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांच्या सह इतर अधिकाNयांनी हातात तिरंगा घेऊन घोड्यावर बसून रॅली मध्ये सहभाग घेतला, या वेळी भारत माता की जय, हर घर तिरंगा अशा घोषणांचा जयघोष करत देशभक्ती पर गाणे वाजविण्यात आले.सदर रॅली ही कलेक्टर ऑफिस ते अशोक वाटिका , उड्डाण पूल, टॉवर मार्गे, धिंग्रा चौक, ओपन थेटर, गांधी चौक, तहसील कार्यालय मार्गे जात जिल्ह्याधिकारी कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला.