पुढच्या ५ दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ भागांना अलर्ट?

ताज्या घड्यामोडी

राज्यात मान्सूनच्या आगमनानंतर पावसाने ब्रेक घेतला असला तरी आता पाऊस अनेक भागांमध्ये बरसण्यास सज्ज आहे. याबद्दल हवामान खात्याकडून अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई : राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर दोन दिवसांत मान्सूनने ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळतं. मुंबईसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये मान्सून गायब झाला आहे. अशात हवामान खात्याकडून पुढच्या ५ दिवसांमध्ये विदर्भासह मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडला गडगडाटी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या अंदाजानुसार तरी पाऊस होणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, १९ जून रोजी विदर्भात तर १५ ते १७ जून दरम्यान पूर्व मध्य प्रदेशात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नैऋत्य मान्सून आज १५ जून २०२२ रोजी मराठवाडा, संपूर्ण कर्नाटक आणि रायलसीमा आणि तामिळनाडू, किनारी आंध्र प्रदेशचा काही भाग, वायव्य आणि पश्चिम मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात पुढे सरकला आहे.विदर्भ आणि तेलंगणा, आंध्र प्रदेशचा काही भाग, पश्चिम मध्य आणि वायव्य बंगालचा उपसागर, ओडिशाचा काही भाग, गंगेचा पश्चिम बंगाल, झारखंड, संपूर्ण उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि आणखी काही भागात मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. तर पुढील २-३ दिवसांत बिहारच्या काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *