
बार्शीटाकळी : बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे व पिकांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे शासनाने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून त्वरित मदत करावी अशा प्रकारची मागणी नगराध्यक्ष व इतरांनी बार्शीटाकळी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. बार्शीटाकळी तालुक्यात सततच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे शेतातील उभे पिके नष्ट झाले आहेत या पिकाचा सर्वे करून बागायती शेती करिता दीड लाख रुपये व कोरडवाहू शेती करिता हेक्टरी 75 हजार रुपयांची देण्यात यावी अशा प्रकारची मागणी करिताबार्शीटाकडीचे तहसीलदार यांच्याकडे नगराध्यक्ष महफूज खान बांधकाम सभापती हसन शहा नगरसेवक सय्यद जहागीर सय्यद इमदात गुड्डू भाई संतोष राऊत अतीक अखिल आदींनी दिले आहे