“माझ्याकडे पक्षाची निशाणी नसली, तरी फरक पडत नाही”,- राज ठाकरे

Maharashtra State


गेल्या दोन महिन्यात राज्यात घडलेल्या सत्तानाट्यामुळे अनेक नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच, सत्तेची समीकरणं देखील मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटाची बंडखोरी आणि त्यानंतर सत्तेत सामील होण्याच्या निर्णयामुळे नेमकी खरी शिवसेना कोणती? शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असेलल्या धनुष्यबाणावर कुणाचा हक्क असेल? असे मुद्दे उपस्थित झाले आहेत. त्यासंदर्भात प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं असून येत्या २५ ऑगस्ट रोजी यासंदर्भात ५ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्ष पदाधिकाऱ्यांसमोर केलेल्या भाषणात टोलेबाजी केली आहे. यातून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनाच टोला लगावल्याचं बोललं जात आहे.हिप बोन शस्त्रक्रिया झाल्यानंतर बराच काळ राज ठाकरे सार्वजनिक आयुष्यापासून लांब होते. बऱ्याच काळानंतर आज राज ठाकरेंनी केलेल्या भाषणात चौफेर टोलेबाजी केली. यावेळी २०१९ साली मुख्यमंत्रीपदाची मागणी केल्यावरून उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीकास्त्र सोडलं. “२०१९ला निवडणुका झाल्यानंतर शिवसेना-भाजपानं फारकत घेतली. का? तर म्हणे अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबत ठरलं होतं. मला अजूनही आठवतंय. मला माहिती आहे. कारण बाळासाहेब असताना झालेल्या त्या बैठकांमध्ये मी होतो. बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे असे बरेच जण होते. तिथे पहिल्यांदा ती गोष्ट ठरली की ज्याचे जास्त आमदार, त्याचा मुख्यमंत्री. जर ही गोष्ट तुमच्यात ठरली आहे, तर २०१९ला तुम्ही मुख्यमंत्रीपदाची मागणी करूच कशी शकता?”, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *