अवैध पार्विंâग ने नागरीक झाले त्रस्त
अपघाताची शक्यता वाढण्याची भिती
अँकर….
शहरातील सर्वच प्रवेश द्वारावर ट्रक पार्विंâग चे रोजचे चित्र आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी तर होतेच. त्याच बरोबर अशा प्रकारच्या अवैध पार्विंâगने अपघात होण्याची शक्यता बळावते.
शहरातील अकोट फाईल असो, की वाशिम बायपास रोड असो की शिवनी असो या बाळापूर नाका असो या सर्वच ठिकाणी अगदी रस्त्यांच्या कडेला ट्रक पार्विंâग केल्याचे चित्र रोज असते. या ट्रक पार्विंâगमुळे या भागातील नागरीकांना याचा फटका बसतो. त्याच बरोबर या अवैध पार्विंâगच्या नावाखाली अनेक अवैध व्यवसाय या ट्रकच्या माध्यमातून छुप्या पध्दतीने सुरु असतात. अवैध ट्रक पार्विंâगमुळे अपघात होण्याचा सर्वाधिक धोका असतो. अशी सर्व परिस्थिती पाहता ट्रान्सपोर्ट नगर मध्ये हे सर्व ट्रक उभे करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्याच बरोबर शहरातील एट्रीपार्इंटवर उभे राहणारे ट्रक हटविण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.