
आलेगाव : आज दिनांक ८/९/२२ रोजी आलेगाव येथे गणेश ” विसर्जन सोहळा शांततेत पार पडला, गावामध्ये एकूण आठ गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली होती. ८ सप्टेंबर रोजी गावातुन वाजत गाजत आनंदाने मिरवणूक काढण्यात आली होती. मागील दोन वर्ष पासून कोरोना प्रादुर्भावामुळे या उत्सवासापासून लोक वंचित होते परंतु या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गणपती विसर्जन आनंदाने व मिरवणूक काढून पार पडले. त्यामध्ये जय बजरंग गणेश मंडळ, बालगोपाल गणेश मंडळ गोंडपुरा , श्रीराम मंदिर गणेश -मंडळ, संत मीराबाई गणेश मंडळ, सार्वजनिक गणेश मंडळ – गणेशगिर गणेश मंडळ वनजरी पुरा या सर्व मंडळानी निर्गुणा नदीपात्रामध्ये बाप्पाचे विसर्जन केले. उभा वेळी अघटित घटना घडू नये या करिता चान्नी पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.