जुलै ते ऑक्टोबर मध्ये निवडणूका शक्यता

वृत्तसंस्था
मुंबई,
राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांचे वाढती संख्या यामुळे महापालिका निवडणूका पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता वाढली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर कुठल्याच परिस्थितीत निवडणूक घेणे शक्य होणार नाही. अशा वेळी पहिले कोरोना नियंत्रण मग निवडणूका अशीच काय ती भूमिका घ्यावी लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बंदिस्त जागेत काम करणाNयांनी मास्क वापरण्याची गरज प्रशासन,शासन व्यक्त करत आहे. दरम्यान,१४ महापालिकेच्या निवडणूका या कोरोना चे रुग्ण संख्येत वाढ झाल्यास पुढे ढकलाव्या लागतील. दरम्यान, ओबीसी आरक्षणावर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात काय भूमिका, अहवाल सादर करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येत्या जुलै ते ऑक्टोबर दरम्यान राज्यातील रखडलेल्या १४ महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ३१ मेपर्यंतची मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचंही समजतंय. ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुका रखडल्या. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर पार पडलेल्या सुनावणीत राज्य सरकारनं केलेला कायदा फेटाळला आणि १५ दिवसात निवडणुका जाहीर करा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लवकरच १४ महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.
यासर्व घडामोडीनंतर राज्यात होणाNया १४ महापालिका निवडणुकांच्या तारखांबाबत पहिल्यांदाच राज्य निवडणूक आयोगानं संकेत दिलेत. येत्या जुलै ते ऑक्टोबर दरम्यान मुंबई, ठाणे, नागपूर महानगरपालिकेसह १४ महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ९ महिन्यांपूर्वी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच संभाव्य तारखांबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून संकेत मिळाले आहेत. तसंच राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसाठी ३१ मेपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरणार आहेत, असं आयोगानं निश्चित केलं आहे.
राज्य निवडणूक आयोगानं १४ नागरी संस्थांच्या महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात म्हटलं आहे की, स्थानिक-स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तीन टप्पे आहेत. प्रभाग आणि आरक्षण सोडत, निवडणूक आयोगानं तयार केलेली विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी जाहीर करणं आणि तिसरी पायरी म्हणजे निवडणूक. १४ महापालिकांची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे. तसंच या निवडणुकीसाठीची मतदार यादी ७ जुलैपर्यंत जाहीर करण्यात येईल. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, अकोला, अमरावती या १४ शहरांतील महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहे. यातल्या काही जिल्ह्यात महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रलंबित आहेत.
