मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय, की इकडचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणार आहे. पत्रव्यवहार करणार आहे. उत्तर प्रदेशात महाराष्ट्र सदन होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कारण महाराष्ट्रातून खूप लोक अयोध्येत येत असतात. १००-२०० खोल्यांचं महाराष्ट्र सदन होण्यासाठी आम्ही योगींशी बोलणार आहोत.
