अतिवृष्टी पावसा मुळें शेतकरी झाला हवालदिल
आठ एक्कर कपाशी वर झाला आता पर्यंत एक लाखाच्या वर खर्च
अकोट : अकोट तालुक्यातील पुंडा येथील महिला शेतकरी यांचे शेत विटाळी (सावरगाव) शेतशिवारा मध्ये येते भरपूर पाऊस झाल्या मुळें आठ एक्कर शेतात रोटावेटर घालून कपाशी चे पीक मोडावे लागले आहे मागील वर्षी कापसाला १४ हजारा पर्यंत भाव मिळाला त्याच आशेने आसेगाव (बाजार) सर्कल मध्ये मध्ये कपाशी चा पेरा खूप वाढला आहे परंतू पाऊस जास्त झाल्या मुळें बरेच पिकांची वाट लागली आहे या भागात वन्यप्राणी हरीण, माकडं,डुकरे,रोही यांचा सुद्धा शेतकऱ्यांना खूप त्रास होत आहे त्या करिता संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आव्हान पुंडा वाशियानी केले आहे
पुंडा हे गाव कोरडवाहू असून खारपान पट्या मध्ये येते परंतु महसुल विभागाने बागाईत भाग आसेगाव (बाजार) सर्कल मध्ये टाकले आहे त्या मुळे या गावाला विम्या पासून वंचित राहावे लागते पुंडा हे गाव महसुल विभागाने कुटासा सर्कल मध्ये टाकावे अशी मागणी शेतकऱ्यां न कडून होत आहे.
अनिता दादाराव सपकाळ
महिला शेतकरी पुंडा
पहिलेच कर्जाचा डोंगर त्यात निसर्गाचा असा कोप एक लाखाचे वर शेत पेरणी पासून आता पर्यंत खर्च झालेला आहे महसूल विभाग व कृषी विभाग नी आमचे शेतात येऊन पंचनामे करून मदत मिळून द्यावी,
अनंत कुलट
गेल्या महिन्यात सतत धार पावसामुळे कपाशी झाल्यामुळे बुरशी मोठ्या प्रमाणावर बसून आली आहे सतत पावसामुळे मूंग उडीद पिकावर बेंडक्या रोग आल्यामुळे व कपाशी तन झाल्यामुळे शेतकरी दुबार संकटात सापडला आहे, तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी सतत धार पावसामुळे उद्या कपाशी पिका ट्रॅक्टर रोटावेटर मारून पीक नष्ट केले आहे शेतकऱ्याचे नुकसान बघता सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी आस शेतकरी करीत आहे
ज्ञानेश्वर कुलट पूंडा
सतत धार पावसामुळे माझे चार एकर मधील कपाशी पीक व 14 एकर मुंग पाण्याखाली आल्याने कारणास्तव उभ्या पिकात ट्रॅक्टर पणजी मारावी लागली याची पाहणी संबंधित कृषी अधिकारी अधिकाऱ्याने करावी आणि मला सरसगड नुकसान भरपाई द्यावी,