नेमकी कुठली भाजी विकत घ्यावी याची समस्या कायम
सततच्या पावसाने भाज्यांचे दर वाढले
गृहिणींसमोर मुलांच्या डब्याचा प्रश्न
भाजी नेमकी काय करावी मोठा प्रश्न
सततच्या पावसामुळे भाज्यांची आवक रोडावली आहे. परिणामी भाज्यांच्या विंâमती कडाडू लागल्या आहेत. अकोल्यात काही भाज्या या साठ रुपये तर काही एंशी रुपये किलोच्या घरात गेला असून, अन्य भाज्यांची विक्रीही सरासरी ८० रुपये किलोनेच होत आहे.
सततच्या पावसामुळे भाज्यांची आवक रोडावली आहे. परिणामी भाज्यांच्या विंâमती कडाडू लागल्या आहेत. यंदा या सर्वच भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे भाज्या लवकर खराब होऊ लागल्या आहेत. परिणामी भाज्यांची आवक रोडावली आहे. त्यातून दरवाढ होत आहे. बाजारपेठेतील घाऊक व्यापाNयांकडेच रोज भाज्यांची आवक रोज दोन ते चार टक्के कमी होत आहे. ज्या भाज्या बाजारात पोहोचतात त्यातीलही ३० ते ४० टक्के माल खराब असतो. त्यामुळे भाज्यांची दररोज दरवाढ होत आहे. प्रामुख्याने कांदा, बटाटा या दोनच भाज्या सध्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. इतर सर्व भाज्यांचे भाव चांगलेच वधारले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास सर्वच भाज्या किरकोळ बाजारात १०० रुपये किलोवर जाण्याची शक्यता व्यापाNयांनी व्यक्त केली आहे. बाजारपेठेत भाजी विव्रेâते भाव करुच देत नसल्याची ओरड गृहिणींची आहे.