माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही असली घाण येऊन बसली – राज ठाकरे

Maharashtra State

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम हे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक सुवर्णपान आहे. संपूर्ण देशाच्या इतिहासात मराठवाडा मुक्ती संग्राम हा प्रदीर्घ लढा होता. आज १७ सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस. आजचा दिवस खरं तर संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता, असं प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. त्याचवेळी गेली कित्येक वर्ष संभाजीनगर महापालिकेच्या खुर्चीत बसून लूट करणारे आणि रोज संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे ‘सजा कार अर्थात लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना रझाकार आणि “सजाकार ह्या दोघांचा बंदोबस्त करेलच, असा इशाराही राज ठाकरे यांनी शिवसेनेला दिला आहे.हैद्राबादच्या निजामाला हैद्राबाद हे स्वतंत्र राष्ट्र हवं होतं आणि त्यासाठी त्याची कितीतरी वर्ष आधी तयारी सुरु होती. कल्पना करा की जर त्याचा हा हेतू झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाडयातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे. आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे.
               मला असं एक नेहमी वाटतं. ह्या इतक्या मोठ्या लढ्याबद्दल आपल्याकडे बऱ्यापैकी अनभिज्ञता आहे. मला अनंत भालेरावांचं ह्या विषयावरचं पुस्तक वाचून त्याबद्दल काही गोष्टी कळल्या, मग पुढे नरहर कुरुंदकरांची ह्या विषयावरची व्याख्यानं युट्युबवर ऐकताना नवीन माहिती मिळत राहिली. पण एकूणच असं वाटतं की ह्या इतक्या गौरवशाली इतिहासाबद्दल फारसं कोणाला माहित नाही. माझं तर म्हणणं आहे की आता जे नवं शिक्षण धोरण येतंय, त्यानुसार त्या त्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळे आता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिहास पाठयपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा, हे महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये. पुढे ठाकरे बोलतांना म्हणाले, संभाजी नगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीयेत तर आधुनिक सजाकार पण येऊन बसलेत. गेली कित्येक वर्ष संभाजीनगर महापालिकेच्या खुर्चीत बसून लूट करणारे आणि रोज संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे ‘सजा’कार… अर्थात लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना रझाकार आणि सजाकार ह्या दोघांचा बंदोबस्त करेल…. असो, आजच्या मुक्ती संग्रामाच्या दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा. माझे मराठवाड्यातील जनतेला आवाहन आहे की तुम्ही जो लढा दिला तो देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील गौरवशाली लढा आहे, त्याचं विस्मरण होऊ देऊ नका. आधुनिक रझाकारांच्या विरोधातील हाच इतिहास आपल्याला बळ देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *