अकोला : जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसा मुळे जिल्यातील दानापूर येथे मोठया प्रमाणावर केळी, कपाशी, सोयाबीन, पपई, भाजीपाल्याचे नुकसान झाले.. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय मात्र पावसा सोबत आलेललेल्या जोरदार हवे मुळे केळीबागांचे, कपाशी, पान पिप्रि, पपईचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी परत एकदा आर्थिक संकटात सापडला आहे..शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई घ्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.. या पावसामुळे आता उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे.